तांबे यांच्या अकॅडमीवर संतप्त पालक, विद्यार्थ्यांची तुफान दगडफेक,तांबे पैशाच्या जीवावर लोक विकत घ्यायचे काम करतात.
पोलिस ,हॉस्पिटलचा रिपोर्ट मॅनेज करायचा, पालकांना मॅनेज करून विद्यार्थ्याचं नामोनिशान मिटवण्याचा तांबेचा धंदा ?
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
तांबे सर कोण रे, चप्पल मारा दोन रे ! तांबे सरांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजी करत इचलकरंजी शहरातील तरुणांनी मंगळवारी सायंकाळी तांबे अकॅडमीच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. कार्यालयाच्या काचा फोडल्या, पोस्टर फाडले, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस केली, वृक्षाच्या कुंड्या फोडल्या. या प्रकारानंतर रिक्रेशन हॉल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सामाजिक कार्यकर्ते व आंदोलनकर्ते राहुल राजू आवळे यांनी तांबे अकॅडमीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत तांबे यांच्या अकॅडमी मध्ये पैसे असणाऱ्यांना प्रवेश मिळतो, ज्या विद्यार्थ्यांना त्रास होतो, अशी विद्यार्थी बाथरूम मध्ये आत्महत्या करतात. अशी प्रकरणे दाबायची पोलिसांना मॅनेज करायचे.
हॉस्पिटलचा रिपोर्ट सुद्धा मॅनेज करायचा पालकांना सुद्धा मॅनेज करून विद्यार्थ्याचं नामोनिशान मिटवून टाकायचं असा आरोप करून, अशा कार्यपद्धती विषयी जाब विचारल्याशिवाय थांबणार नसल्याचे स्पष्ट करीत, हे तिसरे प्रकरण आहे, आत्तापर्यंतची कोणतीही प्रकरणे बाहेर पडू दिले नाहीत, तांबे पैशाच्या जीवावर लोक विकत घ्यायचे काम करतात. असा आरोप करून इचलकरंजी शहराच्या डोक्याला झिनझिन आणल्या.
गेल्या वर्षभरापासून तांबे अकॅडमीतील अनेक गैरकारभार, गैरप्रकार उघडकीस आले आहेत. परंतु, अर्थकारणाची पेरणी करत, तांबे यांनी अकॅडमीची बदनामी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांच्या फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. पण, पलूस येथील विद्यार्थ्यांची संशयित आत्महत्या तांबे यांना त्रासाची ठरणार अशी आंदोलन स्थळी चर्चा होती.
दरम्यान, मयत यश याच्या पालकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन दिले आहे. त्याचबरोबर बुधवारी उद्या सकाळी सक्षम शासकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत, यश याचे सीपीआर मध्ये शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.