मनोरुग्ण महिलेला स्मशानभूमीत आलेल्या त्या युवकापासून धोका असल्याची जाणीव झाल्यामुळे तीने वेगवेगळ्या मार्गाने कडाडून विरोध केल्याची चर्चा !
उदगावची महाराष्ट्रात बदनामी होत आहे, झाली आहे, सरपंचांनी पुढाकार घेऊन नेमकी घटना काय आहे ? याचा खुलासा करावा.
उदगाव : खमक्या वृत्तसेवा
महिला मनोरुग्ण असल्यामुळे ती कुठेही फिरत असते, ज्या दिवशी महिला स्मशानभूमी मध्ये गेली होती, त्या दिवशी तिच्या अंगावर साडी होती. तिने कासोटा घातल्यामुळे तिचे मांडीपर्यत पाय उघडे दिसत होते. तसेच ती मनोरुग्ण असल्यामुळे तिने आपल्या अंगावर पदर व्यवस्थित घेतलेला नव्हता.
महिला मनोरुग्ण असली तरी, तिला स्मशानभूमीत आलेल्या त्या युवकापासून धोका आहे, याची जाणीव झाल्यामुळे तीने वेगवेगळ्या मार्गाने कडाडून विरोध केल्याची चर्चा आहे. या प्रकाराकडे अनेकांच्या नजरा आहेत, प्रवासी मोबाईलवर शुट करीत आहेत, हे लक्षात आल्यानंतर, तो लगेचच पळून गेल्याचे अनेक लोकांनी पाहिल्याची चर्चा आहे.
या प्रकाराची लोचट, भाडखाऊ “संत्या” ला फोन वरून माहिती दिली. “संत्या”ने टीआरपी वाढवण्याच्या हव्यासापोटी अंधश्रद्धा, भानामती, काळी जादू, असे नाव देऊन, दोन महिण्यापुर्वीचे जुने फुटेज देवून महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा आणि उदगावची बदनामी केल्याची चर्चा आहे. फुटेज होते तर, यापुर्वी प्रसिध्दी का दिली नाही ? असाही सवाल नागरीक करीत आहेत.
काही वर्षापुर्वी उदगावच्या यात्रेत, श्वान पळवण्याच्या स्पर्धत तलवारी नाचवल्या अशी खोटी प्रसिध्दी देवून उदगाव बदनाम केले. पोलिसांनी यात्रा कमिटीला ताब्यात घेवून फैलावर घेतले. त्यानंतर “संत्या”ने खोटी प्रसिद्धी दिली असे कबुल करून स.पो.नि. कदम यांच्या समोर “माफीनामा” लिहून दिल्याची घटना आजही चर्चेत आहे. तसाच पॅटर्न उदगाव स्मशानभुमीच्या नावावर, मित्राला वाचवण्यासाठी वापरल्याचे लोक सांगताहेत.
भाडखाऊ “संत्या”ने, कांड करण्यास गेलेल्या मित्राला वाचवायचे, उदगावला बदनाम करायचे आणि भानामतीची प्रसिद्धी करायची, टीआरपी वाढवायचा असा चौफेर हेतू डोक्यात ठेवून डाव साधल्याची चर्चा आहे.भानामती, काळी जादू, करणी बाधा असा प्रकार करणाऱ्या त्या दोघा महिला पुरुषाला पोलिसांनी अद्याप ताब्यात का घेतले नाही ?
याबाबत जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या घटने संदर्भात कोणताही गुन्हा नोंद नाही किंवा कोणासही ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्ट केले.स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार या घटनेमुळे उदगाव गावची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे, झाली आहे. त्यामुळे उदगाव गावचे सरपंच यांनी पुढाकार घेऊन नेमकी घटना काय आहे ? याचा खुलासा करावा अशी मागणी होत आहे.