“गालावर दाढी छत्रपती शिवाजी महाराजांन सारखी पण, काम मात्र मोगलाईचे”
एका गरीब “गाय” असणाऱ्याची, 25 हजाराची “बंद” सुपरी घेतली. अन् हिशोब मांडला एक हजाराचा !
खमक्या विशेष वृत्त
करणाऱ्याला “आहेर” आणि बघणाऱ्याला “मार” !, चोर, भ्रष्टाचाऱ्याला “खुर्ची टेबल” आणि प्रामाणिकाला “घरचा रस्ता” !, ऐकावे “संजय”चे आणि करावे “चुकीचे”, मी नाही “एक हजारा”तला आणि आडना लावा “लाखा”तला ! अशा नवीन म्हणी गिरवून एकत्रीतपणे तालुका हताळणाऱ्या “संजय” आणि संशयखोर “अनिलराव” यांच्या गंमतीशीर कारभाराची “त्या” तालुक्यात चर्चा उसळली आहे.
संजय नावाचा पदाधिकारी म्हटले की, माकडं व त्याच्या पिल्ल्याची गोष्ट आठवते. तसे “त्या” तालुक्यात, त्याचे मोठे वजन आहे म्हणे. पण, पैशाला लालची आणि दारूच्या व्यसनाधीन गेलेला अशी त्याची ओळख. संजयराव सांगतात तुलनेत अनिलरावांचे दुय्यम दर्जाचे पद आहे पण, लाखाने पैसे गोळा करण्याचा मोठा हव्यास गड्याला, अशी दोघांची ओळख असल्याची चर्चा आहे.
संजय नावाचा इसम “रामदास” स्वामींच्या नावाने हातात कटोरी घेवून भटकंती करून लोकांना फसवून उपजीविका आणि हप्ता भरण्यासाठी पैसे गोळा करीत असतो तर, अनिलराव दक्षिणेकडे तोंड करून पंख्याखाली सावलीत बसून, अधिकाराची भाषा बोलून, धादांत खोटे बोलत, संशयात्मक नजरेने लाखाचे बंडल मोजतो, अशी चर्चा आहे.
भूसंपादनाचा शेरा कमी करायचा ? तर, मग चला जयसिंगपूरच्या समांतर यंत्रणेकडे ?
तशी, दोघांची महती “त्या” संपूर्ण तालुक्याला माहित असल्याचे नागरिक बोलतात. काही दिवसापुर्वी दोघांनी “रामदास” स्वामींचे नामस्मरण करून कोणताही “तह” करायचा नाही. कुलूपाला असे “सील” असे ठोकायचे की, “दार” फोडण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशी रणनिती आखल्याची चर्चा आहे.
“गालावर दाढी छत्रपती शिवाजी महाराजांन सारखी पण, काम मात्र मोगलाईचे” अशा धोकेबाजीतून संजयने रणनितीनुसार एका गरीब “गाय” असणाऱ्याची, 25 हजाराची “बंद” सुपरी घेतली. काम फत्ते करण्यासाठी अनिलरावांबरोबर बैठक घेतली. संजयने 24 हजार खिशात घातले अन् एक हजाराचा हिशोब मांडून दुसऱ्याच्याच नरडीला सुरी लावली. अन् अनिलरावांच्या हातात आयतं पेटतं कोलीत आलं.
लाखांचे बंडल मोजणाऱ्या अनिलरांवानी तर, एक हजारासाठी पाक आब्रुच काढली, दम भरला. अधिकार, मालकी दाखवली. पण, रस्त्यावर पेटतं कोलीत घेवून किती लोक थांबले आहेत याचा अंदाज त्यांना अजून आला नाही. संजयने विस्तवाचा खेळ सुरू केला आहे, पाणी त्यालाच ओतावे लागेल, नाही तर, आग होणार ! अशी “त्या” तालुक्यात चर्चा आहे.