“अनिलराव” याना अशी संगत चालते कशी ? त्यांचे तर, चारित्र्य कुठे स्वच्छ आहे ? “लाच लुचपत प्रतिबंधक विभाग” मागे लागू शकत नाही का ?
“लाखो” रुपयांची “तोडपाणी” करणाऱ्या “खाजगी” लोकांना आतील “खुर्ची”वर जागा आणि “हजार” रुपये घेणाऱ्याला बाहेरचा रस्ता ?
कुरुंदवाड/टाकळी : खमक्या वृत्तसेवा
देशातील पहिले तांत्रिक, संशोधनाचे “रेन्सेलेर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट” (आरपीआय) विद्यापिठाचा पहिला कुलगुरू आहे, असे सांगणाऱ्या “संजय”ने कोणताही संबंध नसताना “जरा…द…ळे आतीच करायला लागलाय” अशी भाषा बरळायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. ज्या “संजय”ला “विधवा”, “परितक्त्या”, “दिव्यांग” महिलांचे पैसे पुरले नाहीत. त्या व्यक्तीने अशी भाषा करायची का ? असे लोक बोलत असल्याचे कळते.
पण, “संजय”च्या भयानक “भानगडी” बाहेर पडायला सुरूवात झाल्यातर तोंड दाखवायला देखील जागा शिल्लक राहील की, नाही. अशा तर्क वितर्कातून “त्या” तालुक्यात उलट सुलट चर्चा रंगल्याचे असल्याचे समजते.
“लाखो” रुपयांची “तोडपाणी” करणाऱ्या “खाजगी” लोकांना आतील “खुर्ची”वर जागा आणि “हजार” रुपये घेणाऱ्याला बाहेरचा रस्ता असा धंदा “अनिलराव” यांनी “संजय”च्या सांगण्यावरून सुरू ठेवत, इतर 11 लोकांशी संगणमत करून बुधवारी एकाचा “बकरा” केल्याची चर्चा पंचायत समिती, पोलीस ठाणे, नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग परिसरात रंगली होती.
“संजय”, “अनिलराव”, “रामदास स्वामी”, “बंद सुपारी”, “खेळकर वृत्ती”, “रेन्सेलेर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट” (आरपीआय), “गुंझारी”अठवले” “गालावर दाढी छत्रपती शिवाजी महाराजांन सारखी पण, काम मात्र मोगलाईचे” अशा “खमक्या”च्या वृत्ता मधील “पात्रांची” ओळख पटल्यामुळे “त्या” तालुक्यात या “जोडगोळी”ला “शिव्यांची लाखोली” वाहिली जात असल्याचे समजते.
विशेष म्हणजे “लाख मोलाची माया” मोजणाऱ्या “अनिलराव” यांनी एका “मद्यपी”च्या फोनवर विश्वास ठेवला कसा ? असा सवाल करून “त्या” तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे सांगितले जात आहे.
“त्या” तालुक्यात “रामदास स्वामीं”चे नाव घेऊन “भटकंती” करणाऱ्या “संजय”ने निराधार, वयस्क महिला पुरुषांना शासनाकडून पैसे मंजूर करून देताना प्रत्येकी “12 हजार” रुपये मोजल्याचे सर्व ज्ञात असताना “अनिलराव” याना अशी संगत चालते कशी ? “अनिलराव” यांचे तर, चारित्र्य कुठे स्वच्छ आहे ? त्यांच्या मागे “लाच लुचपत प्रतिबंधक विभाग” लागू शकत नाही का ? असा सवालात्मक “तिरस्कार” नागरिक बोलून दाखवत असल्याचे समजते.
एकाचा “बकरा” केल्याच्या घटनेमुळे “त्या” तालुक्यात संतापाची लाट उसळणार असल्याचे समजते. “रामदास स्वामीं”च्या नावावर शंभर जणाकडून 500, 1000 रुपये गोळा करून मुंबई, दिल्लीची वारी करून, उरलेले पैसे उपजीविकेसाठी वापरणाऱ्याने एकदा स्वतःला “आरशात” बघून, “कोण अति करायला लागलय” हे ठरवावे, असे “त्या” तालुक्यातील लोक बोलत असल्याचे समजते.
पुढील बातमी : माझे नाव “अनिलराव” मी “संजय”च्या सांगण्यावरून वाळू, मुरूम, माती, दगड, स्टोन क्रेशर, खडी, क्रशर, एम स्टॅन्ड खातो !