आत्मसन्मानाची विक्री करून, “पुरावा” नष्ट करण्यासाठी केला जबरदस्त प्रयत्न, पण “यश”ने “पौर्णिमा”चा चंद्रच केला फस्त.
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
इचलकरंजीच्या गाव भागात एक “पौर्णिमा”चा चंद्र उगवला. रात्रीच्या अंधारात अवकाशातून आपले पांढरे शुभ्र “तेज” फेकून “तांबे-पितळ” सारख्या “गंज” चढलेल्या धातूला काळ्याकुट्ट अंधारात चमकवण्याचा बेत रचला. “दहा” लाखाची सौदेबाजी करून आत्मसन्मान विकला, अशी कथा इचलकरंजी शहरात चर्चेत आली आहे.
“पौर्णिमा”चे तेज महत्त्वाचे ? की, दहा लाख महत्त्वाचे ? की, “तांबे-पितळ” महत्वाचे ? “श्रद्धा” नेमकी कशावर ठेवायची ? या विवंचनेचा निष्कर्ष “दहा” लाखाच्या सौदेबाजीवर येऊन थांबला, आणि इथेच “पौर्णिमा”च्या चंद्राचा अस्त सुरू झाला.
“गंज” चढलेल्या “तांबे-पितळ” धातूच्या वस्तूला झळाळी देण्याच्या नादात “पोर्णिमा”च्या चंद्राने यश अपयशाचा विचार न करता, थेट “यश”लाच मूठ माती देवून, वाईट हेतूने “यादवी” माजवण्याच्या निर्णय घेतला, आणि हाच निर्णय “पौर्णिमा”च्या चंद्राचा बळी घेणारा ठरला.
“पौर्णिमा”च्या चंद्राने अंगाखांद्यावरील “स्टार” आणि तेज निर्माण करणाऱ्या कपड्यातून भीतीचे साम्राज्य निर्माण करून, बाजी मारण्यासाठी “दहा” लाखाच्या सौदेबाजीचा “पुरावा” नष्ट करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. “अशोक” चक्र सोडेन अशी धमकीही दिली.पण “यश”ने हा डाव यशस्वी होऊन दिला नाही.
अल्प आयुष्य घेऊन जन्माला आलेली “श्रद्धा” टिकवण्यासाठी “पौर्णिमा”च्या चंद्राने “दहा” लाखासाठी आपल्या “आत्मसन्मान”ची विक्री केली, “यश”चा बळी घेतला, गाव भागातील सर्व “स्टार”ना बदनाम केले.
बघता बघता ही माहिती इचलकरंजीच्या गाव भागात पोहोचली. “गंज” चढलेल्या “तांबे-पितळे” सारख्या धातूला चकाकी देण्यासाठी “पौर्णिमा”च्या चंद्राने पत्करलेली “लाचारी” चर्चेत आली. “श्रद्धा”ला बळ देण्याकरीता केलेली सौदेबाजी उघड झाली.