अनैतिक कामामुळे तमाम लोक मला “गुरू” मानतात. काही जण “महागुरू” म्हणतात. लोकांची माझ्या संस्थेवर अफाट “श्रद्धा” जडली असून लोक भेटायला येताना “ताट”-“तांबे” “वाटी” घेवून येतात. पैसा “जेऊ” घालून आरोपीसारखे खाली मान घालून निघून जातात. असे अपमानास्पद शब्द वापरून “मिजाशी” मिरवणाऱ्या “थांबे” महागुरूची अब्रु वेशिला टांगल्याची सर्वत्र चर्चा आहे.
जागा, इमारती, चालती बोलती माणसे गिळंकृत आणि बाळकावण्याचा अधिकार आहे. नमूद कामे कशी करायची याचे “शिक्षण” देण्यासाठी शासनमान्य “अकॅडमी” स्थापन केल्याचे “थांबे” नेहमी सांगत असल्याचे समजते.परंतू, काही विक्षिप्त घटनेमुळे “त्या” महाप्रतापी “थांबे” महागुरूच्या मतलबी कृत्यावरून त्या आजी-माजी मंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर सुद्धा शंका निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गाव भागातील “पौर्णिमा” चंद्राच्या “दहा लाख” मोलाच्या उपकारातून “तांबे-पितळ” सारख्या धातूला चकाकी, झळाळी आली असून आता कुणी वाकडे करू शकत नाही. असा “टेंबा” मिरवणाऱ्या “थांबे” महागुरूच्या “राक्षसी” प्रवृत्तीला नुकतेच चांगले ठेचून काढले. हुते नव्हते, ते बाहेर फेकून देवून जाम “सिल” ठोकले, त्यामुळे “थांबे” महागुरूचा अपमान झाला रे ! त्याची चांगलीच जिरली रे ! अशी अखंड चर्चा सुरू असल्याचे कळते.
आता अब्रूचे खोबरे होणार ! फसवायचे, लाटायचे दिवस संपले आहेत. भारतीय न्याय संहिता, मागच्या भागाचे सालटे काढल्याशिवाय सोडणार नाही. अनैतिक विचारांच्या अतिक्रमणावर हातोडा पडणारच ! आता, “श्वान”च्या भुमिकेत “मुरगाळून” उभा राहिल्याशिवाय सुटका नाही.अशी खात्री पटल्यानंतर “थांबे” महागुरुने सारवासारव सुरू केली.
अनैतिक विचारांच्या अतिक्रमणावर “यश” मिळवण्याचा, “थांबे” महागुरूचा प्रयत्न त्याच्याच आंगाशी आला. जागा, इमारती, चालती बोलती माणसे गिळंकृत आणि बाळकावण्याच्या “अकॅडमी” बद्दल जनतेत रोष निर्माण झाला. “थांबे” महागुरुने संबंध नाही, जाम “सिल” ठोकले तरी काय फरक पडत नाही, अशी “शेळी” डरकाळी फोडली. पण, ह्रदयाला भोक पडले होते. “थांबे” जाम अस्वस्थ झाला. पण, “बुच” निघणारे नव्हते काय करणार ?