ढपला पाडण्याच्या वृत्तीमुळे कामगारांचा पाच महिन्याच्या पगाराचा प्रश्न गंभीर होऊ शकतो ? कुठे एकत्र यायचे हा कामगारांचा प्रश्न ?
ठेकेदार, पुंदे सर म्हणतात, कामगार कार्यालयात तक्रार करून त्याने “उपटून” घेतली काय ? नाही, पण आता…… !
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शासकीय कागदपत्रांची पूर्तता नाही, नियम अटींचे घसघशीत उल्लंघन, पर्यावरण प्रदूषण आणि कामगार कायदा धाब्यावर बसून, कोट्यावधीची लूट करून, कामगार व शिरोळकरांना देशो धडीला लावल्याचा आरोप होत असलेल्या सह्याद्री ऍग्रो सायन्सेस प्रोपा. सर्जेराव पुंदे यांचे पुढील बील निघण्याची शक्यता नसल्याने कामगारांच्या पगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होणार अशी चर्चा आहे.
पुंदे, ठेकेदार, काही कामगारांना 8,9 तर काहींना 11,12 हजार रु. पगार देतो असे खुद्द कामगार सांगताहेत. नियमाने 19,590 रु.पगार देणे अपेक्षित आहे. पुंदे यांनी मागील तीन महिण्याचा पगार दिला नाही. थकित पगार भागवण्यासाठी, नगरपरिषद आता ठेकेदाराला बील आदा करेल असे दिसत नाही. त्यामुळे पगाराविना कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती कामगार, नागरिकातून व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे.
ठेक्याची मुदत अजून दोन महिने शिल्लक आहे. यादरम्यान करारानुसार ठेकेदाराला ठेका बंद करता येत नाही. त्यामुळे ठेकेदार, पुढील दोन महिने विना पगार, काम करा पाच महिन्याचा सगळाच पगार एकदम देतो. अशी दिशाभूल करणारी विनंती कामगारांना करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय जो कामगार पुढील दोन महिने विना पगार काम करेल त्याला एकदम पाच महिन्याचा पगार दिला जाईल असे अमिष दाखवण्याबरोबर, जो कामावर येणार नाही, त्याला थकित पगार दिला जाणार नाही असा दम सुद्धा दिला जाऊ शकतो, अशी शिरोळ शहरात चर्चा आहे.
मुळामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत कामगारांचा होणारा संपूर्ण पगार ठेकेदार याने उचलून त्याची गुंतवणूक अन्यत्र ठिकाणी केली असल्यामुळे कामगारांना पगार दिला जाईल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त होत असल्याचे समजते.
वास्तविक पाहता, विना पगार काम करायचे किंवा नाही हा प्रश्न कामगारांवर अवलंबून आहे. थकित पगारासाठी कामगार नगरपरिषदेमध्ये किंवा घनकचरा डेपोवर किंवा पुदे यांच्या घरासमोर एकत्र जमून पगाराची मागणी करू शकतात, असेही लोक बोलत असल्याचे समजते
घनकचरा ठेकेदार पुंदे यांच्याकडून कायदेशीर नियम अटींची जोवर पूर्तता होत नाही तोवर नगरपरिषद कोणतीही बिल देऊ शकत नसल्याचे जाणकार सांगत आहेत. मुळामध्ये कामगारांची कोणतीही शासकीय देणी न देता, उलट त्यांना कमी पगार देऊन ठेकेदाराने संगणमतातील लोकांसमवेत यापूर्वीच कामगारांना भिकारी करून सोडल्याचे दुःख शहरात व्यक्त केले जात आहे.